Monday, 8 June 2020

8 जून जागतिक महासागर दिन विशेष

                   8 जून 
                            जागतिक महासागर दिन


         जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था ; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.

            जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.

महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे.

मूळ संकल्पना व सुरुवात :-

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.


पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७१ टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे आणि त्यापैकी तब्बल ९७ टक्के जलसाठा हा खाडय़ा, समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे. ‘द ओशन प्रोजेक्ट’ या १९९७ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या (आणि आता जागतिक झालेल्या) प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, संग्रहालये यांच्या संघटनेने ‘एकच महासागर’ ही संकल्पना मांडली. परंतु भौगोलिकदृष्टय़ा आणि राजकीयदृष्टय़ाही या ‘एकच महासागरा’ची पाच खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे समुद्र हा खाद्य आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन पुरविणारा स्रोत, जैवविविधतेचे महाकाय भांडार, अनेकविध रत्ने, खनिजे, तेल आपल्या उदरात बाळगणारा रत्नाकर.. ही सर्व वर्णने अपुरी पडतील अशा अगणित मार्गानी महासागर मानवासाठी व एकुणातच चराचर सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. तापमान नियंत्रण, निसर्गातील जलचक्राचे नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण हेदेखील सागर घडवून आणतो.

या पार्श्वभूमीवर, सागर-महासागराचे शाश्वत विकास व सागरी परिसंस्थेचे मानवी अस्तित्वासाठी असलेले मोलाचे योगदान पाहता, त्यातील साधन-संपत्तीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जन-जागृती व्हावी या हेतूने दरवर्षी ८ जून रोजी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा करण्यात येतो. सागराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचा एक दिवस ठरवावा ही मूळ कल्पना कॅनडा सरकारतर्फे १९९२ साली झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा करत २००८ साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या कल्पनेला अधिकृत मान्यता दिली.


यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक मिळून समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्वानाच सागराबद्दल कुतूहल असते. आज जगभर साजरा होत असलेल्या या महासागर दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र आहे- ‘शाश्वत महासागरासाठी नवसर्जन’! अर्धी पृथ्वी जरी आपण तिच्या नैसर्गिक स्वरूपात राखू शकलो, तरी तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अभ्यासपूर्ण कयास आहे. त्याआधारे, २०३० सालापर्यंत कमीत कमी ३० टक्के तरी जमीन आणि जलस्रोतांचा भाग संरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन यंदाच्या महासागर दिनानिमित्त जगभरच्या धोरणकर्त्यांना, राज्यकर्त्यांना करण्यात आले आहे. या मोहिमेबद्दल अधिक माहिती https://worldoceansday.org/about/conservation-action-focus/ या संकेतस्थळावर मिळेल. आजच्या ‘जागतिक महासागर दिना’निमित्त जीवसृष्टीची तारणहार असणारी ही नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासाठी संघटित प्रयत्नांचा संकल्प करू या.

अधिक माहिती:-

सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या... कचरा कोणताही असो- “फेका समुद्रात !” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र, एवढ्याशा कच-याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत... हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्टे आहे.


२०२० चे ध्येय

प्लॅस्टिकपासून महासागरांचे रक्षण करणे असे ध्येय २०२० वर्षासाठी संस्थेकडून निश्चित करण्यात आले आहे.

स्त्रोत:- इंटरनेट

No comments:

Post a Comment