15 मे जागतिक कुटुंब दिन
🍃जागतीक कुटुंबदिनाच्या हार्दिक शुभेच्या
☝️ वर क्लिक करा आणि विडिओ पहा
१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे.
⭐ सद्यस्थितीत असंख्य कुटुंबाची अवस्था अशी आहे जिथे ते कुटुंब महिनो-महिने एकत्र भेटत नाही. फोन अथवा सोशल मिडियाद्वारे ते एकत्र असतात.
🔰 एकीकडे याआधी एकत्र कुटुंब राहायचं तस कुटुंब क्वचितच आढळत.त्यातच आजकाल लग्न झालेल्या मुलांचे आई-वडील वृद्धाश्रमात आढळला.ही परंपरा आपली नसूनसुद्धा आपण त्याच्या जवळ गेलोय.
🔰देशात हम दो, हमारे दो ही संकल्पनाही मागे पडत असून हम दो, हमारा एक ही संकल्पना जोर धरु लागली आहे.
🔰काही घरांत आजी-आजोबा एकीकडे आणि मुले पाळणाघरात आणि आई-वडील दिवसाचा किमान १० तास नोकरीला असेच चित्र सध्या पहायला मिळते.
🔰सोशल मीडियाही विभक्त कुटुंबाला कारणीभूत आहे. दिवसभरात रात्रीच्यावेळी एकत्र येणारी मंडळी एकमेकांत संवाद न साधता सोशल मीडिया आणि टीव्ही-मालिकांमध्ये व्यस्त होऊन जाते. त्यामुळे त्यांचात संवाद सुद्धा होत नाही.
🔰आजकाल तर काय कुटुंबाचे व्हाट्सअपवर ग्रुप पाहायला मिळतात. मात्र या ग्रुपमुळे घरी भेट देणारे कुटुंब आता व्हाट्सअपवर संवाद साधू लागले. अशाप्रकारे कुटुंबव्यवस्था धुळीस मिळाली आहे.
🔰घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण देशात वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची
कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे.
🔰संपूर्ण स्थितीकडे पाहता कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिनी’ एकत्र येऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा नायनाट केला पाहिजे.
कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबात प्रेम नसेल, ते कुटुंब, कुटुंब नसून स्मशान आहे. असे समजावे. आपल्याला माहित आहे. स्मशानात अनेक प्रेत असतात, परंतु एकमेकांना कधी भेटत नसतात किंवा बोलत नसतात. ज्या कुटुंबात सासू-सून, पती-पत्नी आणि पिता-पुत्र एकत्र राहत असूनही एकमेकांना बघून आनंदीत होत नसतील, तर ते कुटुंब स्मशान नाही काय? आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे.
'हेल्पेज इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 52 टक्के वृद्ध अशिक्षित आहेत. 50 टक्के वृद्ध आर्थिक दृष्ट्या आपल्या मुलांवर व सुनांवर अवलंबून आहेत. 85 टक्के वृद्ध वैद्यकीय उपचारावरील खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. 98 टक्के वृद्ध हे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत नाहीत. याबाबत तक्रार करणे मग लांबच राहते. अपमान सहन करणे हा या वृद्धांच्या दिन चर्येचाच भाग बनला आहे. 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून आपण संपूर्ण जगात साजरा करतो. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही. 15 मे जागतिक कुटुंब दिनी भारतातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि सुख समृद्धीने नांदावे तसेच एकत्र कुटुंबपद्ध सर्वत्र रूजावी व एकत्र कुटुंबपद्धतीत वाढ व्हावी, एवढीच या 'जागतिक कुटुंब दिनी' अपेक्षा!
📍जिव्हाळा हा घराचा कळस आहे
📍माणुसकी ही घरातील तिजोरी आहे
📍गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे
📍शांतता ही घरातील लक्ष्मी आहे
📍पैसा हा घराचा पाहूणा आहे
📍व्यवस्था ही घराची शोभा आहे
📍समाधान हेच घराचे सुख आहे…! 🌹
🍃 जागतीक कुटुंबदिनाच्या हार्दिक शुभेच्या

No comments:
Post a Comment