11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन
🔺जयंती विशेष
◾️मूळ आडनाव – गोह्रे
◾️जन्म – 11 एप्रिल 1827, कटगूण सातारा
◾️मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890, पुणे
◾️1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली
◾️1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार
◾️21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी
◾️युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक
🔺 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय :-
◾️ आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.
🔺 महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण :-
फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.
🔺 विवाह :-
◾️महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
🔺 संस्थात्मक योगदान :-
◾️3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
◾️4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
◾️1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
◾️1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
◾️1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
◾️1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
◾️10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
◾️24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
◾️व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
◾️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
🔺 महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
◾️1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
◾️1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘
◾️1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्या लोकांना अर्पण केला.
◾️1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
◾️1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
◾️1880 पासून लोखंडे यांनी दिनबंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
◾️1883 – शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ.
◾️1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
◾️अस्पृश्यांची कैफियत.
◾️शिवाजी महाराजांचा पोवाडा.
🔺महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:-
◾️थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.
◾️1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
◾️1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
◾️1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
◾️2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.
◾️ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
◾️उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
◾️सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘
◾️सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.
संकलन /स्रोत - Wikipedia

👍
ReplyDelete