जागतिक दृष्टीदान दिन
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.
उद्देश्य:-
जागतिक दृष्टीदान दिनाचे उद्दिष्ट नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे.त्यामुळे ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ किंवा ‘दृष्टी आड सृष्टी’ ह्या म्हणी तयार झाल्या आहेत.माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या चक्षूद्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे डोळ्यांना मानवाच्या पंचेद्रियामध्ये मानाचे स्थानआहे.डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य टिपण्याबरोबर मनात स्थान निर्माण करून त्यांची छबी मनपटला बरोबर सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते.
दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळावे यासाठी नेत्रदान किंवा दृष्टीदान प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास होवू शकेल. अर्थात नेत्रदान मरणोत्तर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस नक्कीच होईल.
मानवाच्या जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधाना मदत करू शकतात. तेव्हा दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करू शकतो
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?:-
🔴 चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं: - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.
🔴 धूम्रपान सोडावं :- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात.
🔴 सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा: - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
🔴 सेफ्टी ग्लासेस वापरा :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.
🔴 संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास : वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
🔴 टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
🔴 कमी प्रकाशात वाचू नका : डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
🔴 डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.
🔴 खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
🔴 कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं: कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा.
असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही.
भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
📌 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव
📌 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
📌 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
📌 सामाजिक आणि धार्मिक मान्यता
जगाच्या एक तृतीयांश अंध लोक भारतात...:-
संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक हे भारतात आहेत. भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.
मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे:-
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.
तुम्हीही करू शकता नेत्रदान:-
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
ही संकल्पना राबविण्यासाठीचा दिवस म्हणजे दृष्टीदान दिवस होय.प्रत्येक माणसाने नेत्रदानाचा संकल्प केल्यास जगातील मोठ्या प्रमाणात नेत्रहिन व्यक्ती प्रकाशात देवू शकतील.डोळे उघडे ठेवून नेत्रदान संकल्पाचा विचार आणि आचार सामान्य माणसांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.डोळ्यांमुळे माणसांच्या चेहऱ्यायावरील भाव,स्वभाव, प्रत्येक माणूस सहज ओळखू शकतो.
त्यामुळेच ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीतभावनांचे’, ‘डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका’ इ. डोळ्यांच्या विशेषणांची गाणी झाली.‘डोळे’ माणसाला सौंदर्याबरोबर अनेक गोष्टी शिकवतात. माणसा माणसातील कपड्यांची आवड, त्यांच्या चेहरेपट्टी वरून ओळखला जाणारा स्वभाव, त्यांची पाहण्याची दृष्टी, त्यातून घेतला जाणारा बोध, एकूण डोळे इतर अवयवांपेक्षा अधिक माहिती माणसाला देतात.
त्यामुळे ‘दृष्टीदाना’चे वेगळे महत्व चटकन माणसाला जाणवते.‘दृष्टीहीन’ या सर्व गोष्टींना मुकतो. त्याच्या जीवनांतील अंधार दूर होण्यासाठी किमान प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान संकल्प करावा.त्यामुळे याच देही, याच डोळी, जीवनांत प्रकाश पडेल.
स्रोत:- इंटरनेट

No comments:
Post a Comment